नवी दिल्ली ः यंदाच्या अार्थिक वर्षात देशातील १२ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणण्याच्या दिशेने केंद्र सरकार काम करत अाहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली.
तसेच देशातील ९९ सिंचन प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे निर्याजन अाहे. यामुळे एकूण ७६ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली अाणण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथे पाचव्या जल सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय जलसंपदाराज्य मंत्री अर्जून राम मेघवाल उपस्थित होते. या वेळी देशातील जलस्रोतांविषयीचे केंद्रीय जल अायोगाच्या मोबाईल ॲपचे लॉचिंग करण्यात अाले.
कृषिमंत्री सिंह म्हणाले, की यंदा (२०१६-१७) ८ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणू शकते. अाता १२ लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली अाणण्याचा प्रयत्न अाहे. पुढील दोन वर्षांत २० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. गेल्या काही वर्षात जे शक्य झाले नाही; ते अाता शक्य होत अाहे, असा दावा त्यांनी केला अाहे. पाण्याची बचत करा, पाण्याचा कार्यक्षम वापर करा, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.
जलसंपदा राज्यमंत्री मेघवाल यांनी पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागृती करण्याची गरज व्यक्त केली. भविष्यातील पिढीसाठी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची अाहे. पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे; त्याचा गैरवापर थांबला पाहिजे, असे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. जल सप्ताहाची सुरवात १० अाॅक्टोबर रोजी झाली अाहे.