नवी दिल्ली ः बाजरी, ज्वारी, नाचणी या तृणधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे, तसेच अाहारात त्याचा वापर वाढावा, या उद्देशाने २०१८ हे अांतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर करावे, अशी विचारणा भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली अाहे.
याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र पाठविले अाहे. याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी ट्विटरद्वारे दिली अाहे.भारत तृणधान्य उत्पादनात अाघाडीवर अाहे. गहू, तांदूळ या धान्यांपेक्षा तृणधान्यांमध्ये पोषणमूल्ये अधिक अाहेत. त्यासाठी तृणधान्यांचा अाहारात वापराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न अाहे. तृणधान्ये पिके ही कोरडवाहू अाणि उष्णकटिबंधीय हवामानात तग धरू शकतात, असे कृषिमंत्रालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले अाहे.
तृणधान्यांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. तसेच तृणधान्यांच्या अाहारातील वापरामुळे लठ्ठपणा, मधुमेह अाणि जीवनशैलीशी संबंधित उद्भवलेल्या अारोग्य समस्या हाताळण्यास मदत होईल. तृणधान्यांबाबत ग्राहक, उद्योग अाणि धोरणकर्त्यांमध्ये जागृती कमीच अाहे. परिणामी, त्याचे उत्पादन कमी असून अाहारातील वापरही कमी झाला अाहे.
या पार्श्वभूमीवर २०१८ अांतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर केल्यास या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले अाहे.भारतात मुख्यतः बाजरी, ज्वारी, नाचणी ही तृणधान्ये पिके घेतली जातात. राजस्थानात बाजरीचे अधिक उत्पादन घेतले जाते. नाचणी उत्पादनात कर्नाटक देशात अाघाडीवर अाहे.