नगर ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या अडीच महिन्यांच्या कालावधीत कांदाविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ९२ हजार ८४७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५७ हजार २०० अर्ज पात्र ठरले आहेत. त्यांना साडेचाळीस कोटींचे अनुदान मिळणार आहे. अजूनही ३४ हजार २३२ अर्जांची छाननी बाकी आहे. त्यामुळे हा आकडा ६० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर २०१८ पासून कांद्याच्या भावात अचानक घसरण झाल्यामुळे शेतकरी रस्त्यावर आले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना व शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. यामुळे सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या दीड महिन्यांच्या कालावधीत कांदाविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेऊन त्यांना अनुदान देण्यात दिले. त्यानंतरही कांद्याच्या भावात सुधारणा झाली नाही. त्यामुळे १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान कांदाविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा झाला.
या दरम्यान जिल्ह्यातील दोन लाख ५१ हजार ५९१ शेतकऱ्यांनी ४२ लाख दोन हजार ८६९ क्विंटल कांदाविक्री केला आहे. यापैकी ९२ हजार ८४७ शेतकऱ्यांनी कांद्याच्या अनुदानासाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी ५९ हजार ५१९ अर्जांची छाननी झाली. त्यात ५७ हजार २०० अर्ज पात्र ठरले. त्यातील ३४ हजार २३२ अर्जांची छाननी होणे बाकी आहे. या पात्र लाभार्थींनी२० लाख ४१ हजार ४०७ क्विंटल कांद्याची विक्री केली आहे. या लाभार्थींना ४० कोटी ४९ लाख ८१ हजार ६५८ अनुदान मिळणार आहे. सुमारे ३४ हजार २३२ अर्जांची छाननी बाकी असल्यामुळे कांद्याच्या अनुदानाचा आकडा ६० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कांदा अनुदानाबाबत स्थिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.