थंडीमुळे द्राक्ष घडांचे नुकसान
थंडीमुळे द्राक्ष घडांचे नुकसान

लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष घडांवर परिणाम

बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात वाटा उचलणाऱ्या लोणार तालुक्यातील बागायतदारांना कडाक्याच्या थंडीने मोठा फटका दिला आहे. अंजनी येथील शेतकऱ्याच्या दोन एकरातील बागेमधील द्राक्ष घडांचे थंडीमुळे नुकसान झाले आहे. मण्यांची फुगवण थांबली असून बागेच्या कडेला असलेल्या वेलींची पाने वाळली आहेत. बऱ्याच ठिकाणी घडांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.

याबाबत अंजनी येथील द्राक्ष बागायतदार गजानन होळकर म्हणाले, की यावर्षी थंडी सुरू होण्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने अंजनी येथील द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सलग पंधरा दिवसांपर्यंत थंडी पडली. अशा परिस्थितीत बाग वाचविण्यासाठी उपाययोजना करावी लागली. मात्र तरीही नुकसान टाळता आले नाही. दोन एकरातील ज्या बागेतून ३०० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणे अपेक्षित होते, तेथे आता २०० क्विंटलच्या आता उत्पादन येईल, अशी शक्यता आहे.

अंजनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून हवामानात कमालीचा चढउतार झाला आहे. दिवाळीनंतर वातावरणात गारवा निर्माण होऊ लागला असताना मध्येच उकाड्याचे प्रमाण वाढले. दिवसा उष्मा तर रात्री थंडी असे हवामान होते. त्यामुळे अंजनी परिसरातील द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले.

या स्थितीमुळे मण्यांची गळ होणे, द्राक्षमणी तडकणे, तसेच डाऊनी व भुरीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. फुलोरा व परिपक्व अवस्थेतील द्राक्षबागेच्या व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. तरी देखील बदलत्या हवामानामुळे वाढीच्या टप्प्यातील घडांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने सर्वेक्षण करून मार्गदर्शन, मदत दिली पाहिजे, अशी मागणी श्री. होळकर यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com