बदलत्या वातावरणाची द्राक्ष उत्पादकांना धास्ती

डाउनी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेतील गवत काढून टाकले पाहिजे. गंधकाचा वापर करावा; तसेच स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करताना योग्य मात्रा घेऊन आठ ते दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. याबरोबर द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञाचा सल्ला घेऊन रोगाचा प्रादुर्भाव कमी करता यईल. - एन. बी. म्हेत्रे, द्राक्ष तज्ज्ञ
बदलत्या वातावरणाची द्राक्ष उत्पादकांना धास्ती
बदलत्या वातावरणाची द्राक्ष उत्पादकांना धास्ती

सांगली ः सांगली जिल्ह्यामध्ये मिरज पूर्वसह काही भागांमध्ये द्राक्षे पिकाच्या छाटण्या आगाप घेण्यात येतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बदलत्या वातावणामुळे द्राक्षे पीक धोक्‍यात आले आहे. सकाळी धुके आणि दिवसभर पडणारे ऊन यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. जिल्ह्यात सुमारे १ लाख ११ हजार हेक्‍टर क्षेत्र द्राक्ष पिकाचे आहे. यापैकी सुमारे ४० हजार हेक्‍टरवरील द्राक्ष उत्पादक शेतकरी आगाप छाटणी घेतात. १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीच्या छाटणीला अगोदरची (आगाप) छाटणी म्हणतात. छाटणी पावसाळ्यात येत असल्याने कीड व रोग यापासून काळची घ्यावी लागते. आणि ही द्राक्षे दिवाळ्यात तयार होत असल्यामुळे गोडीस कमी असतात; पण या वेळेस रमजान, नववर्ष व नाताळ येत असल्यामुळे भाव चांगला मिळतो. यंदाही आगाप छाटणी जिल्ह्यात झालेली आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा फटका या शेतकऱ्यांना बसतो आहे. आधईच आगाप छाटणी केलेल्या पिकाला जास्त जपावं लागतं त्यात वातावरणाचीही साथ सुटली तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो.  छाटणीनंतर पोंगा अवस्था असताना ढगाळ वातावरण व सतत पाऊस राहिल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. घड जिरणे म्हणजेच त्या फुटीतून घड बाहेर न पडता त्याचे बालीमध्ये रूपांतर होणे. जिल्ह्यातील मिरज पूर्व भागासह इतर काही तालुक्‍यांमध्ये लवकर छाटण्या असतात. अशा छाटण्या झाल्यानंतर मागील वर्षी या परिसरात जुलै, ऑगस्टमध्ये अतिपाऊस झाला. या परिसरातील द्राक्षबागांमध्ये घड जिरण्याचे प्रमाण वाढले.  जमीन घट्ट झालेली असल्यास मुळांचे कार्य योग्य प्रकारे होऊ शकत नाही. परिणामी, पोषण द्रव्यांची उपलब्धता न झाल्यास घड जिरण्याचे प्रमाण वाढते. आता गेल्या आठवड्यापासून असे वातावरण होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कर्ज काढून बाग घातलेले शेतकरी या वातावरणामुळे धास्तावले आहेत.  

प्रतिक्रिया रात्री थंडी आणि दिवसा वाढती  उष्णता यामुळे फळछाटणी करणे कठीण झाले आहे. आगाप फळछाटणी केलेल्या बागांवर डाउनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्याने छाटणी थांबली आहे. - विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक, वायफळे, ता. तासगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com