गुजरात करणार समुद्राचे पाणी गोड

गुजरात करणार समुद्राचे पाणी गोड
गुजरात करणार समुद्राचे पाणी गोड

अहमदाबाद : गुजरातमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळेच या समस्येवर मात करण्यासाठी समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड पाण्यात रूपांतर करणाचे प्रकल्प उभे करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. यासाठी अंदाजे आठशे कोटी रुपये खर्च येणार आहे. गुजरातला सोळाशे किलोमीटरचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. या नव्या प्रकल्पासाठी या किनारपट्टीचा पुरेपूर फायदा घेण्याची राज्य सरकारची इच्छा आहे. या योजनेतील पहिला प्रकल्प जामनगर येथे उभारला जाणार असून, त्यासाठी इस्राईलच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर राज्य सरकार इतर किनारपट्टींवर आणखी दहा प्रकल्प उभारेल, असे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितले आहे. या प्रकल्पांमुळे कच्छ आणि सौराष्ट्रातील सुमारे दहा लाख जनतेला रोज गोडे पाणी मिळणार असल्याने त्यांच्यासाठी हे वरदान ठरेल, असा दावाही रूपानी यांनी केला आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करून समस्येवर मात करण्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणारे गुजरात हे दुसरे राज्य ठरणार आहे. तमिळनाडूनेही हा प्रकल्प राबविला आहे. हे प्रकल्प खासगी-सार्वजनिक भागीदारीतून उभारले जाणार आहेत. पाणी गोडे केल्यानंतर ते राजकोट, जामनगर, मोर्बी, द्वारका, पोरबंदर, सुरेंद्रनगर आणि कच्छमधील गावांना पुरविले जाणार आहे. या प्रकल्प उभारणीचे कंत्राट एस्सेल इन्फ्रा प्रोजेक्‍ट्‌स या कंपनीला देण्यात आले आहे. प्रकल्प उभारणीसाठी येणारा सर्व आठशे कोटी रुपयांचा खर्च कंपनीच पेलणार असून, सरकार त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहे. तसेच त्यांच्याबरोबर २५ वर्षांचा पाणीखरेदीचा करार करणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com