तापमानवाढीचा भडका; जळगाव ४५ अंशांवर

तापमानवाढीचा भडका; जळगाव ४५ अंशांवर
तापमानवाढीचा भडका; जळगाव ४५ अंशांवर

जळगाव : मागील दीड महिन्यापासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर आहे. तर या महिन्यात २८ दिवस कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसवर आहे. पट पद्धतीने सिंचन केल्या जाणाऱ्या हलक्‍या जमिनीतील केळीला उष्णतेचा फटका बसला असून, कोवळी पाने पूर्णतः करपली आहेत. कमाल तापमानात वाढ होत असल्याने उकाड्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ‘मे हीट’च्या तडाख्यात आग ओकणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दराप्रमाणेच तापमानाचाही भडका उडाला असून, जळगावचे तापमान आज थेट ४५ अंशांवर नोंदले गेले. सोबतच आर्द्रतेतही प्रचंड वाढ झाल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले.  महिनाभरापासून उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तापमान काही अंशांनी देखील खाली येण्याचे नाव घेत नाही. जळगाव शहराचे तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदविले जात असून आठवड्यापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. यातच वाढलेला उकाडा आणि उष्णतेच्या झळांमुळे जळगावकर प्रचंड हैराण आहेत. या आठवड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने उकाडा होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com