गडचिरोलीत धुवाधार

पावसामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील पूल पाण्याखाली गेला.
पावसामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील पूल पाण्याखाली गेला.

पुणे : जवळपास तीन आठवडे उघडीप देणाऱ्या पावसाने शनिवारपासून (ता. ११) राज्यात पुनरागमन केले आहे. रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गडचिरोलीत धुवाधार पाऊस पडला असून, भामरागड तालुक्यातील तरडगाव येथे येथे सर्वाधिक २२६ मिलिमीटर, तर भामरागड येथे २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आणि मराठवाड्याच्या नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अडचणीत आलेल्या खरीप पिकांना दिलासा मिळणार आहे.  राज्याच्या बहुतांशी भागात जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. ऑगस्ट महिन्यातही हलक्या पावसाचा अपवाद वगळता तब्बल दोन आठवडे पावसाची दडी कायम आहे. शनिवारी सायंकाळनंतर पूर्व विदर्भासह राज्याच्या दक्षिण पट्ट्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भातील गडचिरोलीसह, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात पाऊस पडला.  कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम ते जाेरदार, तर रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर असलेल्या भागात पावसाचा जोर अधिक होता. सातारा, कोल्हापुरात अनेक ठिकाणी, तर पुणे, नाशिकमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सर्वदूर मध्यम ते जोरदार, तर लातूरसह लगतच्या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.  रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग) कोकण : कर्जत ३१, नेरळ ४७, कडाव ३०, कळंब ३५, खालापूर चौक ३२, वावशी ४८, कामर्ली ३७, बिरवडी ३४, करंजवडी ३०, नाटे ३२, खारवली ३२, चिपळूण ३५, मार्गताम्हाणे ५०, रामपूर ४०, वाहल ३१, सावर्डे ४३, कळकवणे ४२, शिरगांव ४२,  शिरशी ३३, अंबवली ४२, कुलवंडी ३१, भरणे ३६, पाटपन्हाले ४०, अबलोली ४८, मंडणगड ९५, म्हाप्रळ ९२, देव्हरे ९७, खेडशी ३९, तरवल ४०, कडवी ३६, फुणगुस ३२, कोंडगाव ४१, देवळी ३३, देवरूख ३०, माभले ३३, तेरहे ४८, राजापूर ३३, लांजा ३७, विलवडे ३१, शिरगाव ४२, फोंडा ४२, सांगवे ४०, नांदगाव ४५, तालवट ३१, जव्हार ४२, मोखडा ३२.  मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ४९, घोटी ३३, धारगाव ४७, पेठ ३०, वेळुंजे ३१, शेंडी ६९, बामणोली ३९, हेळवाक ५२, महाबळेश्‍वर १०८, तापोळा ११८, लामज १३३, करंजफेन ४३, मलकापूर ३२, आंबा ७३, राधानगरी ६७, सरवडे ३०, आवळी ३७, कसबा ३८, गगनबावडा ५१, कडेगाव ५२, कराडवाडी ४५,  गवसे ४८, चंदगड ६४, नारंगवाडी ३५, तुर्केवाडी ३१, हेरे ५९. मराठवाडा : उदगीर २०, मोघा २०, जळकोट २२, नांदेड शहर २२, नांदेड ग्रामीण २१, तरोडा २०, बिलोली ४५, सगरोळी ३५, कुंडलवाडी ३०, अदमपूर २८, लोहगाव ३०, मुखेड २५, जांब २०, येवती २२, जाहूर ३२, चांडोळा २५, बाऱ्हाळी २०, मुक्रमाबाद ३८, पेठवडज २३, कापसी २५, कलंबर २४, हदगाव २४, आष्टी ३०, भोकर ४०, मोघाळी २०, मातूळ ४१, किनी ३२, किनवट ६७, बोधडी ४०, जलधारा ३४, शिवणी ४३, मांडवी ५२, दहेली ४०, मुदखेड ३६, बारड ३५, हिमायतनगर २७, जवळगाव २२, सरसम २९, माहूर ३२, वाई ३८, सिंदखेड ४६, धर्माबाद ९६, करखेली ५५, जळकोट ४८, उमरी २८, गोळेगाव २०, अर्धापूर ३६, दाभड २९, कुंटूर २१, नरसी २२, नायगाव ३८, टेंभुर्णी २१.  विदर्भ : कळगाव ४७, अर्णी ४२, लोनबेहल ३७, सावळी ४६, अंजनखेड ३८, राजूर ३२, भलार ३२, पुनवट ३५, शिंदोळा ६१, शिरपूर ३४, झारी झामनी ३५, खडकडोह ३५, मुकुटबन ५७, मथार्जून ३३, चालबराडी ३२, शिवरा ३६, पोहारा ३५, लाखनी ३५, घुगस ३६, राजूरा ५३, कोपर्णा ९८, गडचांदूर ७५. सावळी ३४, पाथरी ३८, विहाड ३६, बल्लारपूर ९०, जेवती ७४, पाटण ६९, गडचिरोली ८७, पोरळा ७०, येवळी ५५, ब्राह्मणी ४२, कुरखेडा ४३, पुराडा ४०, अरमोरी ६०, देऊळगाव ३७, पिसेवढथा ७५, वैरागड ७५, चामोर्शी ७५, कुंघाडा ४८, घोट ३८, आष्टी ३८, येनापूर ३७, सिरोंचा ९९, बामणी १३९, पेंटीपका १२७, असारळी ८६, आहेरी ६०, जिमलगट्टा १४७, अल्लापाल्ली ८०, पेरमिली ११०. एटापल्ली ७८, कासंसूर १२३, जरावंडी ७०, गाट्टा १२३, धानोरा १२०, मुरूमगाव ५२, चाटेगाव ८४, पेंढरी ७१, कोटगुळ. देसाईगंज ४७, शंकरपूर ५२, मुलचेरा ५७, तरडगाव २२६, भामरागड २०७. भामरागड तालुक्‍यातील शंभर गावांचा संपर्क तुटला पूर्व विदर्भातील भातपट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी (ता. ११) रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. रविवारी (ता. १२) दिवसभर सर्वदूर धो धो पाऊस कोसळत होता. भामरागड तालुक्‍यात पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड लगतच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत आहे. परिणामी भामगरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रविवारी सकाळपासून या पसिरातील शंभर गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. शहरी भागातही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले. बाजारपेठेत पाणी शिरल्याचा फटका व्यापाऱ्यांना बसला. या पावसामुळे अनेक दिवसांपासून खंड पडलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तरडगाव येथे अतिवृष्टी गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, तरडगाव येथे २२६ मिमी, तर भामरागड येथे २०७ मिलिमीटरची नोंद झाली. सिरोंचा तालुक्यातील बामणी, पेंटीपका, आहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, पेरमिली, एटापल्ली तालुक्यांतील कासंसूर, गाट्टा आणि धानोरा, तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, लामज, तापोळा येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com