साखर उद्योगाच्या परिस्थितीबाबत दिल्लीत लवकरच बैठक

साखर उद्योगाच्या परिस्थितीबाबत दिल्लीत लवकरच बैठक
साखर उद्योगाच्या परिस्थितीबाबत दिल्लीत लवकरच बैठक

कोल्हापूर : साखरेच्या दरावर ‘एफआरपी’चा दर निश्‍चित केला. आता साखरेचे दर कोसळल्यामुळे "एफआरपी'' देणे अवघड आहे. कारखान्यांनी प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपयांच्या खाली साखर विक्री केल्यास तोटा होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत पंतप्रधानांसमवेत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी येथे दिली.  शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. १३ ते १५ मेच्या दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक घेतली जाण्याची शक्‍यता आहे. श्री. नाईकनवरे म्हणाले, ""प्रत्येक वर्षीचा गळीत हंगाम सुरू होत असताना बाजारातील साखरेच्या दरानुसारच "एफआरपी''ची रक्कम ठरवली जाते. या वर्षीही असा दर ठरविला. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच किरकोळ बाजारात साखरेचे दर ढासळू लागले. याचा फटका साखर कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारने अनुदान जाहीर केले आहे. मात्र, या अनुदानाने साखर उद्योगाला उभारी मिळणार नाही. यासाठी प्रतिक्विंटल ३२०० ते ३३०० रुपये सरासरी दर असणे योग्य आहे. याबाबत कारखान्यांनीही ठाम भूमिका घेऊन सरकारकडे मागणी केली पाहिजे. कारखान्यांची अवस्था पटवून देण्यास पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी केले.  राज्य साखर संघाचे संजय खताळ, कुंभी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे, पी. जी. मेढे, तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, संचालक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com