नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने रोजगार हमी योजनेतून फळबागा उभारण्यासाठी मदतीचा हात दिला. मात्र, शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट होते आहे.
जिल्ह्यात आजमितीस फळबाग लागवडीसाठी १६५२ प्रस्ताव आले असून, त्यापैकी ४६२ बागांची कामे पूर्ण झाली आहेत. ६०७ ठिकाणी कामे सुरू असून, ५८३ बागांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. सरकारने रोजगार हमी योजनेतून राज्यात एक लाख ११ हजार १११ हेक्टर क्षेत्रावर फळबागा लागवडीचे लक्ष्य ठेवले आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागांचे तीन वर्षापर्यंत संगोपन केले जाणार आहे.
शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न प्राप्त व्हावे आणि मजुरांना रोजगार मिळावा हा या योजनेमागील उद्देश आहे. आंबा, पेरू, मोसंबी, डाळिंब अशा विविध प्रकारच्या २४ फळांच्या बागा या योजनेत घेता येतात. शेताच्या बांधावर २६ प्रकारच्या फळझाडांची लागवड करता येणे शक्य आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी ११ कलमी कार्यक्रमांतर्गत रोजगार हमी योजनेमधून फळबागांच्या लागवडीचा उपक्रम आखण्यात आला.
जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा भागात डाळिंब, स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरी गुजरातमध्ये निर्यात केली जाते. जिल्ह्यात पेरू, मोसंबी व इतर फळपिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे जिल्ह्यात फळबागांचा उपक्रम यशस्वी होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यासाठी दिलेल्या एकूण लक्षाकांपैकी केवळ ३० टक्केच बागा पूर्ण करण्यात यश आल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
फळबागा अथवा बांधावर फळझाडांची लागवड केल्यानंतर पुढील तीन वर्षे संगोपनाची जबाबदारी कृषी विभागावर आहे. झाडांच्या संगोपनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने रोजगार हमी योजनेतून फळबागा उभारण्यासाठी मदतीचा हात दिला.
मात्र, शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट होते आहे.
जिल्ह्यात आजमितीस एक हजार ६५२ फळबागांचे प्रस्ताव आले असून, त्यापैकी ४६२ बागांचे काम पूर्ण झाले आहे. ६०७ ठिकाणी काम सुरू असून, ५८३ बागांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.