समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार इगतपुरीत कायम

समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार इगतपुरीत कायम

घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार इगतपुरी तालुक्यातील अद्याप कमी झाली नाही. हे हेरून शेतकऱ्यांची मनधरणी करण्यासाठी समृद्धीबाधित कृती समितीच्या पदाधिकाऱ्यासमवेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. त्यात शेतकऱ्यांच्या वतीने हा महामार्ग रद्द करावा, अन्यथा दुसरीकडून हलवावा ही प्रमुख मागणी करण्यात आली. त्यावर गिरीश महाजन यांनी आपण मुख्यमंत्री व शेतकऱ्यांची लवकरच बैठक घेऊन यावर ठोस उपाययोजना करू, असे आश्‍वासन दिले.

या वेळी शिष्टमंडळाने अनेक विषयांवर चर्चा केली असता तालुक्यातील ७२ टक्के जमीन संपादन केली आहे, बाधित २३ गावांपैकी १९ गावे पेसाअंतर्गत आहेत, बहुतांश धरणे इगतपुरीत असल्याने राहिलेली जमीन सिंचनाची आहे, त्यामुळे ही जमीन वाचवावी, बाधित जमिनीचा रेडिरेकनर दर हा शहापूरपेक्षा खूपच कमी असल्याने परत सुधारित दरपत्रक जाहीर करावे, बाधितांना शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशा अनेक मागण्यांचे निवेदन या वेळी देण्यात आले.

या शिष्टमंडळात महापालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील, माजी आमदार शिवराम झोले, कृती समितीचे अध्यक्ष कचरू डुकरे, सचिव भास्कर गुंजाळ, मधुकर कोकणे, अरुण गायकर, संपतराव काळे, दौलत दुभाषे, रतन लंगडे, मच्छिंद्र भगत, जयराम काळे, भागवत गुंजाळ, राजेंद्र भटाटे, वसंत भोसले, ज्ञानेश्‍वर तोकडे, रामेश्‍वर शिंदे, शिवाजी भोसले उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com