द्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणीला महत्त्व

द्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणी, अन्नद्रव्य व्यवस्थापनाला द्या महत्त्व
द्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणी, अन्नद्रव्य व्यवस्थापनाला द्या महत्त्व

सोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यावर त्याची काळजी महत्त्वाची आहे. द्राक्षाची योग्य वेळी छाटणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनावर लक्ष दिल्यास द्राक्षाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढेल,’’ असे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्रात नुकतेच द्राक्षपीक परिसंवाद आयोजिण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड होते. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय, द्राक्ष संघाचे खजिनदार महेंद्र शाहीर, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एम. अमृतसागर, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, द्राक्ष संघाचे विभागीय अध्यक्ष शिवानंद माळी, राजेंद्र देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, ‘‘द्राक्षाची छाटणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरनंतर करावी. त्यामुळे द्राक्षाच्या हंगामात चांगला दर मिळू शकतो. अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यासाठी द्राक्षामध्ये योग्य वेळ फार महत्त्वाची आहे. द्राक्ष संशोधन केंद्राने मेडिका हे नवीन वाण संशोधित केले आहे. अवर्षणप्रवण भागातही हे वाण उपयुक्त ठरणारे आहे.``

डॉ. सोमकुँवर, डॉ. उपाध्याय यांनी द्राक्ष उत्पादनातील विविध बाबी सांगितल्या. डॉ. तांबडे, अमोल शास्त्री , डॉ. पी. व्ही. कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com