उत्तम व्यवस्थापनाद्वारेच कापसाच्या उत्पादनात वाढ; तज्ज्ञांचे मत

उत्तम व्यवस्थापनाद्वारेच कापसाच्या उत्पादनात वाढ; तज्ज्ञांचे मत
उत्तम व्यवस्थापनाद्वारेच कापसाच्या उत्पादनात वाढ; तज्ज्ञांचे मत

धुळे : कापूस पीक चांगले उत्पादन देते; परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाचे खत व्यवस्थापन, फवारण्या आणि गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी प्रभावी कार्यवाही करायला हवी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ॲग्रोवन व स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजी लि. (पुणे) यांच्यातर्फे ‘कापूस लागवड तंत्रज्ञान व गुलाबी बोंड अळी` या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन शिरढाणे (जि. धुळे) येथे करण्यात आले. या वेळी धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील व कृषिविद्या शास्त्रज्ञ जगदीश काथेपुरी यांनी मार्गदर्शन केले. स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजी लि.चे वरिष्ठ व्यवस्थापक प्रदीप पाटील, विक्री प्रतिनिधी मार्तंड रनाळकर, शिरढाणेचे सरपंच कैलास पाटील, प्रगतिशील शेतकरी अमृत पाटील, खते वितरक अजय शिंदोडिया, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कापूस लागवडीस ७० दिवस झाल्यानंतर पिकात एकरी किमा दोन कामगंध सापळे लावावे. जैविक कीडनाशकांची फवारणी करून ही अळी नियंत्रणात आणता येते. निंबोळी अर्काची फवारणी निर्देशानुसार करावी.``

काथेपुरी म्हणाले, ‘‘कापसाचे खत व पाणी व्यवस्थापन यावर लक्ष दिले पाहिजे. नत्राची पुरेशी मात्रा मिळावी. लागवडीवेळी २० टक्के, ३० दिवसांनी ४० टक्के आणि नंतर ६० दिवसांनी ४० टक्के नत्र दिले पाहिजे. फुलगळ होत असल्यास तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार तातडीने फवारणी घ्यावी. तणनाशकांची फवारणी काळजीपूर्वक करावी. लागवडीला किमान ३५ दिवस झाल्यानंतरच तणनाशके फवारावीत. त्या वेळी आवश्‍यक काळजी घेतल्यास विषबाधा होत नाही.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com