शेतकऱ्यांशी 'अटॅचमेंट' वाढवा : कृषी आयुक्‍त

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शिवारभेटी कमी झाल्या आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांशी थेट संवाद होत नसल्याने ही दरी वाढती राहिली आणि कृषी क्षेत्रासमोर नवनवीन आव्हाने उभी झाली. त्यावर पर्याय म्हणून कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कॅबिनबाहेर पडत शिवारभेटींना प्राधान्य दिले पाहिजे, असा सल्ला कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिला.

वनामती येथे सोमवारी (ता.८) आयुक्‍त सिंग यांनी नागपूर व अमरावती विभागाचा आढावा घेतला. या सर्व तालुक्‍यांतील जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शेतीसंदर्भातील समस्या जाणून घेण्याकरिता शिवारभेटीशिवाय पर्याय नाही. परंतु नजीकच्या काळात शेतकरी आणि कृषी कर्मचाऱ्यांमधील संवाद कमी झाला.

त्यातूनच अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. शेतकऱ्यांशी अटॅचमेंट असेल तर त्यांच्याशी निगडित समस्या जाणता येतील आणि त्याचे वेळीच निदान करता येणे शक्‍य होणार आहे. विदर्भात अशाप्रकारच्या उपक्रमाची गरज असून कर्मचाऱ्यांनी शेतशिवाराला भेटीसाठी प्राधान्य द्यावे, असा सल्ला कृषी आयुक्‍तांनी दिला. योजनांच्या अंमलबजावणीबाबत नाराजी

अमरावती व नागपूर विभागाचा आढावा घेताना काही योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बैठकीतच झाडाझडती घेतली. कृषी यांत्रिकीकरणावर येत्या काळात भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्याकरीता अतिरिक्‍त उद्दीष्ट निश्‍िचत केले जाईल, असेही आयुक्‍त म्हणाले. बैठकी दरम्यान वातावरण चांगलेच गंभीर झाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com