औरंगाबादला आजपासून हवामानावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

औरंगाबादला आजपासून हवामानावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र
औरंगाबादला आजपासून हवामानावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

औरंगाबाद : राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आणि जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हवामान बदल व त्यांचे कृषी आणि जलक्षेत्रावर होणारे परिणाम या विषयांवर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र बुधवारपासून (ता.14) वाल्मी औरंगाबाद येथे होत आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनात्मक आढावा घेऊन याविषयीची माहिती मंगळवारी (ता 12) देण्यात आली. चर्चासत्राचे उद्‌घाटन महात्मा गांधी मिशन, औरंगाबाद येथील रुक्‍मिणी सभागृहात बुधवारी सकाळी 10 वाजता होणार होणार आहे. कार्यक्रमास पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा, निती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद, चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू तसेच वाल्मीचे महासंचालक गोसावी, महिकोचे अध्यक्ष राजू बारवाले उपस्थित राहणार आहेत.

असे असतील महत्त्वाचे मुद्दे

  •  हवामान बदल, कृषी क्षेत्रावर होणारे परिणाम
  •  जल क्षेत्रावर होणारे परिणाम, मत्स्य मत्स्य व पशु यावर होणारे परिणाम
  •  अल्पभूधारक शेतकऱ्यांची हवामान बदलावर मात करण्याची उपाययोजना
  •  आठ वेगवेगळ्या सत्रात विविध संशोधनपर निबंधाचे सादरीकरण
  •  कृषि क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी विविध नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंबधी उपाययोजना सुचविल्या जाणार
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com