खानदेशात अनियमित वीजपुरवठा

खानदेशात अनियमित वीजपुरवठा
खानदेशात अनियमित वीजपुरवठा

जळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे. कूपनलिकांमधील ही पातळी चार ते पाच मिटरने कमी झाली आहे. त्यातील कृषिपंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. यातच वीज कंपनीकडून अनियमित, कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पंपांमध्ये अनेक ठिकाणी बिघाडही वाढल्याचे सांगितले जात आहे. 

हिवाळा संपत आहे, तशी पिकांना पाणी देण्यासह वाफसा कायम राखण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये आहे. कांदा, केळीची लागवड तापी, गिरणाकाठी आहे. चार दिवस दिवसा वीज असते. त्यातच दर अर्ध्या ते एक तासात वीज बंद होते. काही रोहित्र जुनाट व कमी क्षमतेचे आहेत. त्यावरील विजेचा वापर अधिक जोडण्यांमुळे मोठा आहे, असे रोहित्र वारंवार बंद पडतात. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनासंबंधी अडचणी येत आहेत.

दिवसा चार दिवस वीज जळगाव, चोपडा, यावल, पाचोरा व चाळीसगाव भागात मिळते. पाट पद्धतीने कांदा, लहान केळी व इतर रब्बी पिकांना पाणी देताना दिवसा वीज गरजेची असते. मात्र वारंवार रोहित्र दुरुस्त करावे लागतात. कृषिपंप जळाले, की आठ ते  १० दिवस सिंचन करता येत नाही. बाजरी, कांदा पिकाची ज्यांनी पाट पद्धतीने सिंचनाची व्यवस्था केली, त्यांना अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे.

कृषिपंप दुरस्तीसाठी चार ते साडेचार हजार रुपये लागतात. हा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com