सांगली जिल्ह्यात सिंचन योजनांचे ५० टक्के पंप बंद

टेंभू सिंचन योजना
टेंभू सिंचन योजना

सांगली ः जिल्ह्यातील म्हैसाळ, टेंभू, ताकारी सिंचन योजना सुरू असल्यातरी या योजना पूर्ण क्षमतेने चालविणे शक्‍य नाही. याचे कारण म्हणजे या योजनेचे ५० टक्के पंप बंद आहे.

यामुळे दुष्काळी पट्ट्यात पाणी मिळण्यास विलंब होत आहे. मात्र, या पंपामध्ये तांत्रिक बिघाड असल्याने पंप सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगण्यात आले आहे. वास्तविक पाहता हे पंप दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने लक्षच दिले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पाण्याची टंचाई लक्षात घेऊन दुष्काळी भागातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालक्‍यात टेंभू, म्हैसाळ, ताकारी सिंचन योजना सुरू केल्या आहेत. वास्तविक पाहता जिल्ह्यातील या तिन्ही सिंचन योजनांच्या पंपाची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे.

सध्या टेंभू, म्हैसाळ, ताकारी सिंचन योजनेचे ५० टक्केच पंप सुरू आहेत. यामुळे लाभ क्षेत्रात पाणी पोचण्यास विलंब लागतो आहे. पाटबंधारे विभागाने नादुरुस्त असणारे पंप दुरुस्त करण्यासाठी कोणत्याच हालचाली केलेल्या दिसत नाही.

ताकारी सिंचन योजनेच्या २८ पंपापैकी केवळ १४ पंप सुरू असून आणखी ६ पंप सुरू केले जाणार आहेत. मात्र, उर्वरित पंप आठ पंप बंदच आहेत. तर म्हैसाळ सिंचन योजनेचे १०८ पंपापैकी केवळ ७१ पंप सुरू आहेत.

टेंभू, म्हैसाळ, ताकारी सिंचन योजना या प्रामुख्याने दुष्काळी भागाला वरदान ठरत आहेत. मात्र, या योजनेमधील पंपाची देखभाल करणे संबंधित विभागाचे काम आहे. परंतु, या योजनेचे पंपाची दुरुस्ती करणे, यासाठी लागणारा निधीसाठी पाठपुरावा करणे पाटबंधारे विभागाचे काम आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com