जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची वाटचाल शतकाकडे

जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची वाटचाल शतकाकडे
जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची वाटचाल शतकाकडे

जळगाव ः खानदेशात सुमारे एक हजार गावे टंचाईच्या छायेत आली आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे १८० टॅंकर सुरू आहेत. तर धुळे- नंदुरबारात मिळून ८९ पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत.  तात्पुरत्या पाणी योजना, उपाय यांना यश येत नसल्याची स्थिती आहे. कारण, भूगर्भातील जलसाठे आटले आहेत. जळगाव जिल्ह्यात १४८ गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. धुळ्यात ७१ तर नंदुरबारात सुमारे ६७ गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. धुळ्यात ३५ गावांमध्ये २८ टॅंकर सुरू आहेत. नंदुरबारातही सुमारे ७५ गावांमध्ये ६१ टॅंकर सुरू आहेत. टॅंकर मागणीचे प्रस्ताव येतच आहे. विशेष म्हणजे जेथे जलयुक्त शिवार अभियानातून कामे घेतली, तेथेही टॅंकरची मागणी आहे. यामुळे प्रशासनाची टॅंकर मंजूर करताना अडचण होत आहे. हे जलयुक्त शिवार अभियानाचे अपयश असल्याचे चर्चिले जात असल्याने या गावांमधील टॅंकरचे प्रस्ताव उशिराने मंजूर केले जात आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे ३०० गावांसाठी ३१३ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. विहीर खोलीकरण, नव्या कूपनलिका तयार करण्याची कार्यवाहीदेखील सुरू आहे. परंतु, जलस्रोत हवे तसे मिळत नसल्याने टंचाई दूर करण्यासंबंधी अपयश येत असल्याचे प्रशासनातील मंडळीचे म्हणणे आहे.  दोन नद्यांचे आवर्तन दिलासादायक गिरणा नदीतून १० मे रोजी चौथे आवर्तन नदीत पाणीटंचाई निवारणार्थ सोडले. त्याचा लाभ धरणगाव, जळगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्‍यांमधील सुमारे १०० गावांना झाला आहे. तर पांझरा प्रकल्पातून साक्री तालुक्‍यातील टंचाई निवारणार्थ पाण्याचे आवर्तन सोडले आहे. त्याचाही लाभ झाल्याचे सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com