हमीभावावरून अमळनेरला व्यापाऱ्यांनी लिलाव पाडला बंद

हमीभावावरून अमळनेरला व्यापाऱ्यांनी लिलाव पाडला बंद

अमळनेर, जि. जळगाव : हमीभावावरून दोषी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारणावरून आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवला. आज सोमवारचा बाजार असल्याने आवक मोठ्या प्रमाणात होती. लिलाव होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव सुरू करण्याची मागणी केली.

बैठक सुरू असताना संतप्त शेतकऱ्यांनी सभापती दालनातील काचा फोडल्या. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. बाजार समितीचे संचालक उदय पाटील, प्रफुल्ल पाटील, महेश देशमुख, हरी भिका वाणी, संतोष बितराई, एन. के. पाटील आदी संचालकांच्या मध्यस्थीने अखेर दुपारी दोनच्या सुमारास व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केला. मात्र, हा लिलाव व्यापारी आजच करणार असून, उद्यापासून (ता. 31) लिलाव बंद ठेवणार आहेत.

जोपर्यंत अधिकृत ग्रेडरकडून मालाची प्रतवारी करून मिळत नाही तोपर्यंत माल खरेदी केला जाणार नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. शासनाचा हमीभाव व व्यापाऱ्यांची खरेदी यात तफावत असल्याने शेतकरी नाहक भरडला जात आहे. दरम्यान बाजार समितीच्या आवारात रांगा लागल्या होत्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com