जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार

अमरावतीतील २५२ गावांची ‘जलयुक्‍त शिवार’साठी निवड

अमरावती  ः टंचाईमुक्‍त महाराष्ट्र या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जलयुक्‍त शिवार अभियानासाठी २०१८-१९ या वर्षाकरीता जिल्ह्यातील २५२ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला .   
२०१८-१९ या वर्षासाठी या अभियानात ३०५ गावांची निवड करण्याचे उद्दिष्ट होते. जिल्हास्तरीय समितीने या संदर्भात घेतलेल्या आढाव्यानंतर २५२ गावांमध्ये अभियान राबविण्यावर शिक्‍कामोर्तब झाले. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी यावर निर्णय घेतला.
 
जलयुक्‍त शिवार अभियान २०१५-१६ या वर्षांपासून राबविण्यात येत आहे. ज्या भागात या अंतर्गंत कामे झाली त्या भागातील भूजल पातळी उंचावण्यास मदत होत आहे. यापूर्वी जिल्ह्याला २५३ गावांच्या निवडीचे उद्दिष्ट होते.
तालुकानिहाय गावांची संख्या
तालुका गावे
अमरावती
भातकुली
चांदूररेल्वे
नांदगाव खंडेश्‍वर ४१
धामणगाव रेल्वे
मोर्शी २५
चांदूरबाजार २५
अचलपूर २५
वरुड ११
तिवसा
अंजनगावसूर्जी १६
चिखलदरा ४०
धारणी ४०

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com