सरकार शेतकरीविरोधी अन् हुकूमशाहीवादी : खर्गे

जनसंघर्ष यात्रेस प्रारंभ
जनसंघर्ष यात्रेस प्रारंभ

जळगाव : हे सरकार न्याय्य मागण्यांसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करते. शेतकऱ्यांची जी बिकट अवस्था सध्या झाली आहे, त्याला हे सरकार जबाबदार आहे. हे शेतकरीविरोधी व हुकूमशाहीवादी सरकार असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा गुरुवारी (ता.४) फैजपूर येथून सुरू झाला. यानिमित्त आयोजित सभेत श्री. खर्गे बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, आमदार भाई जगताप, सचिन सावंत, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शरद महाजन आदी उपस्थित होते.

श्री. खर्गे म्हणाले, की पेट्रोल दरवाढ बेफाम सुरू आहे. आम्ही पेट्रोल दर नियंत्रणात ठेवले होते; पण हे सरकार पेट्रोलवर भरमसाट कर आकारत आहे. लूट सुरू असून, पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत असून, त्यास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com