स्वामिनाथन आयोगाचा भाजपला पडला विसर : अरविंद केजरीवाल

स्वामिनाथन आयोगाचा भाजपला पडला विसर : अरविंद केजरीवाल
स्वामिनाथन आयोगाचा भाजपला पडला विसर : अरविंद केजरीवाल

सिंदखेडराजा, जि. बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाबाबत भाजपला विसर पडण्याचा अाजार जडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता काबीज करणाऱ्यांना जनता धडा शिकविणार अाहे. दिल्लीतील जनतेने भाजपला सत्तेपासून दूर करीत हे दाखवून दिले, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे केले.  सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीदिनी आयोजित सभेत ते बोलत होते. आम आदमी पक्षातर्फे शुक्रवारी (ता.१२) सिंदखेडराजा येथे महाराष्ट्र संकल्प सभा घेण्यात अाली. या सभेसाठी राज्याच्या विविध भागांतून पक्षाचे कार्यकर्ते आले होते. या वेळी व्यासपीठावर प्रीती शर्मा-मेनन, दिल्लीचे मंत्री राजेंद्र गौतम, पंकजा गुप्ता, देवेंद्र वानखेडे यांची उपस्थिती होती. केजरीवाल म्हणाले, की कोरेगाव भीमा येथील घटना आरएसएस, भाजपने घडवून राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचे स्वप्न धुळीस मिळवले. दिल्लीत तीन वर्षांत तीनशे नवीन सरकारी शाळा आम्ही उभारल्या, तर इथे महाराष्ट्र सरकार शाळा बंद करायला निघाले. महाराष्ट्रातील शाळांमध्ये असंख्य अडचणी आहेत. महाराष्ट्रात तीन लाख कोटींचा बजेट, तर दिल्ली जेमतेम ४० हजार कोटींचा बजेट तरीही यांना शाळा चालवणे कठीण झाले अाहे. जे सरकार शाळा चालवू शकत नाही, ते सरकारही चालवू शकत नाही.या सभेत ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी आपल्या समर्थकांसह आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांचे केजरीवाल यांनी टोपी घालून स्वागत केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com