खानदेशात तापमान कमी, पण उकाडा वाढला

खानदेशात तापमान कमी, पण उकाडा वाढला
खानदेशात तापमान कमी, पण उकाडा वाढला

जळगाव  ः खानदेशात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी सुरू झालेली नसून, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली आहे. परंतु उकाडा मात्र कायम असल्याचे चित्र आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत मागील दोन-तीन दिवसांत कुठेही दमदार पाऊस झालेला नाही. धुळे जिल्ह्यात कापडणे, जापी भागात ३ ते ४ दरम्यान जोरदार पाऊस आला. त्यात नदी, नाल्यांना पूर आला. शेतातील माती वाहून गेली. शहादा, शिरपूर भागांतही दमदार पाऊस झाला. नंतर शेतकरी बंधारे बंदिस्ती व इतर कामांमध्ये व्यस्त होते. ४ व ५ जूनदरम्यान जळगाव, पाचोरा, चोपडा, धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव भागांत पाऊस झाला. वादळामुळे वृक्ष उन्मळल्याने नुकसान झाले. अनेक भागांत मशागत पूर्णत्वास आली आहे. मात्र, मागील दोन-तीन दिवसांत पाऊस आलेला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करणे टाळले आहे. यातच कृषी विभागाने पेरणी करण्यासाठी किमान ५० मिलीमीटर पाऊस हवा. त्याशिवाय सोयाबीन, कापसाची पेरणी किंवा लागवड करू नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे पेरणी झालेली नाही.

सध्या रोज सकाळपासून सुसाट वारा सुटतो. वातावरण ढगाळ असते. रात्रीही वेगवान वारे वाहतात. त्यामुळे तापमान कमी झाले आहे. काळ्या कसदार जमिनीतही ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वहंगामी कापूस, केळी व इतर भाजीपाला पिकांमध्ये शेतकरी सिंचन करीत आहेत. भारनियमन कायम असल्याने रात्रीच्या वेळेसही वीज असताना शेतकऱ्यांना शेतात सिंचनासंबंधी जावे लागत आहे. कमाल तापमान ४० खालीच आहे. सध्या केवळ पूर्वहंगामी कापूस लागवड झाली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com