दुष्काळी पट्ट्यातील खरीप पेरा गेला वाया

उडीद पीक
उडीद पीक

सांगली ः दुष्काळी पट्ट्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्‍यांतील खरिपाचा पेरा पूर्णपणे वाया गेला आहे. मूग, उडीद, बाजरी या पिकांच्या उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होण्याची शक्‍यता आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

दुष्काळी पट्ट्यातील प्रामुख्याने खरीप हंगामातील पिके महत्त्वाची असतात. याच हंगामात दोन पैसे मिळण्यास मदत होते. मात्र, पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके वाळून गेली आहेत. जत तालुक्‍यात सलग पाचव्या वर्षी खरीप वाया गेला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे; तर आटपाडी तालुक्‍यातही अशी परिस्थिती आहे. पेरणी, बी, बियाणे व मशागतीसाठी हजारो रुपये खर्च केला; पण पदरात काही पडणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

जत, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यात सूर्यफुलाची पेरणी केली जाते. मात्र, सूर्यफुलाची पाण्याअभावी वाढ खुंटली आहे. यामुळे सूर्यफुलातून मिळणारा पैसादेखील यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मिळण्याची शक्‍यता कमी आहे. दुष्काळी पट्ट्यातील खरीप वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऊसनवार घेतलेला पैसे कसा फेडायचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.

दृष्टिक्षेपात

  • पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी पट्ट्यातील पिके वाळून गेली
  • मूग, उडीद, बाजरी उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होण्याची शक्‍यता
  • सूर्यफुलाची पाण्याअभावी वाढ खुंटली
  • खरीप वाया गेला असल्याने आर्थिक गणितच चुकू लागले आहे. अशा परिस्थितीत शासनाने मदतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. -  मारुती माळी, मिरवाड, ता. जत, जि. सांगली.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com