यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी एक लाख १९ हजार मेट्रिक टन खतांचा वापर केला असून, यंदा एक लाख ९० हजार मेट्रिक टन खतपुरवठ्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

आगामी खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी नऊ लाख हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदाही कृषी विभागाने नऊ लाख हेक्‍टरवर खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. कापूस, सोयाबीन व तूर जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत. यात कापूस क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार नियोजन सुरू आहे.

खरीप हंगामातील पिकांसाठी खत अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यासाठी कृषी विभागाने एक लाख ९० हजार मेट्रिक टन खतांचे नियोजन केले आहे. यात युरिया, डीएपी, एमओपी, मिश्र खते अशा विविध खतांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना हंगामात अडचण येऊ नये म्हणून कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी एक लाख ९० हजार ४९० मेट्रिक टन खतांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळेच या वेळी जादा मागणी कृषी विभागाने केली आहे. यात युरिया ७५ हजार ५१४, डीएपी २१ हजार, एमओपी नऊ हजार, मिश्रखते ४६ हजार, तर एसएसपीचे ३७ हजार मेट्रिक टनाचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच खते जिल्ह्यात दाखल होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com