खरिपाला लागली पावसाची आस

खरिपाला लागली पावसाची आस
खरिपाला लागली पावसाची आस

नाशिक : नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे काम पूर्ण केले. तरीही जुलैच्या उत्तरार्धात पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची पिके संकटात आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी  शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख ७५ हजार ५९१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी पाच लाख ५ हजार ३७५ हेक्टर म्हणजेच सुमारे ८७.८० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी तृणधान्याचे क्षेत्र ३ लाख ५४ हजार ९२९ हेक्टर आहे. भात, ज्वारी, बाजरी, नागली, मका या पिकांसह ४ हजार ३८४ हेक्टर क्षेत्रावरील अन्य तृणधान्य प्रकारातील पिकांचा समावेश आहे. याबरोबरच जवळपास ३२ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर तूर, उडीद, मूग, तर ३ हजार ४७७ हेक्टर क्षेत्रावर अन्य कडधान्य पिके आहेत.

सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, खुरासणीसह ८१५ हेक्टरवरील अन्य गळीत धान्य पिकांची पेरणी झाली आहे. यातील बहुतेक पेरणी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत झालेल्या पावसामुळे शक्य झाली आहे. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

सध्या शेतशिवारात आंतरमशागत सुरू असून, अधिक उत्पादनासाठी शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे ४५ हजार ५२१    हेक्टर क्षेत्रापैकी ४१ हजार २२६ हेक्टरवर म्हणजे जवळपास ९०.५६ टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. मात्र, त्यावर बोंड अळीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासह रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी झगडावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com