किसान मंचची आज औरंगाबादेत राज्यस्तरीय बैठक

किसान मंचची आज औरंगाबादेत राज्यस्तरीय बैठक
किसान मंचची आज औरंगाबादेत राज्यस्तरीय बैठक

औरंगाबाद : शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय्य हक्‍कांसाठी लढा देण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्यसमितीची बैठक रविवारी (ता.५) औरंगाबादेत होणार आहे. या बैठकीत शेतकरी, शेतमजुरांच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती किसान मंचचे निमंत्रक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली.  किसान मंचच्या माध्यमातून ९ ऑगस्ट ते २ ऑक्‍टोबरदरम्यान सेवाग्राम ते नाशिकदरम्यान शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान काढण्यात आले होते. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाचे हमीभाव, वीजपुरवठा व पीकविम्याबाबत सरकारकडून चालविलेला पोरखेळ थांबविण्यासाठी सरकारला ५ नोव्हेंबरपर्यंतची वेळ देण्याचा ठराव शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाच्या नाशिक येथील समारोपीय कार्यक्रमात करण्यात आला होता. दिलेल्या वेळेत सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत करण्याबाबत कोणताच निर्णय न घेण्यात आल्याने किसान मंचच्या राज्यभरातील २५० तालुक्‍यांतील प्रमुख कार्यसमिती सदस्यांची बैठक औरंगाबाद येथील कै. भानुदास चव्हाण सभागृहात रविवारी आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत शेतकरी शेतमजुरांच्या न्याय्य हक्‍कांसाठी व्यापक लढा उभारण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. धोंडगे यांनी दिली. किसान मंच, राष्ट्रवादी किसान सभा, शेतकरी जागर मंच, कृषक समाज, किसान बिरादरी, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, शेतकरी संघटना व अन्य शेतकऱ्यांच्या संघटनांचा किसान मंचच्या राज्यस्तरीय समितीमध्ये समावेश असल्याचेही किसान मंचच्यावतीने स्पष्ट केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com