शेतकऱ्यांच्या प्रश्नी परभणीत किसान सभेचे धरणे

शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात परभणीत किसान सभेचे धरणे
शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात परभणीत किसान सभेचे धरणे

परभणी : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नागपूर अधिवेशनात जाहीर केलेली हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये तत्काळ देण्यात यावी, या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी (ता. २६) धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, ऊस उत्पादक शेतकरी आस्मानी सुलातीन संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नागपूर अधिवेशनात जाहीर केलेली हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये मदत तत्काळ देण्यात यावी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मंजूर करण्यात यावा. उसाला प्रतिटन २ हजार ५५० रुपये दर द्यावा, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई करावी.

महाराष्ट्र शेतकरी शुगर्स या कारखान्याकडील थकीत ४ कोटी रुपये देय बाकी मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांना देण्यात यावी. वीज जोडण्या खंडित करण्याची कारवाई थांबावी. कर्जमाफीचे सरकारचे गुहाळ थांबवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली राजेभाऊ राठोड, प्रभाकर जांभळे, भिमराव मोगल, सुरेश कच्छवे, सुभाष दिनकर, भास्कर कच्छवे, रामेश्वर मोरे, शेख अब्दुल आदींसह शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com