लाल वादळ मुंबईकडे झेपावले

लाॅंग मार्च
लाॅंग मार्च

नाशिक : गेल्या वर्षभरापासून आश्‍वासन देऊनही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे किसान सभेने पुकारलेला लाँग मार्च बुधवारी दुपारी ४ वाजता निघणार होता. मात्र पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली. काही ठिकाणी आंदोलकांच्या गाड्या अडविल्या. त्यामुळे लाँग मार्च गुरुवारी (ता. २१) रोजी सकाळी १० वा. मुंबईच्या दिशेने रवाना झाला. हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव व राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत.   बुधवारी रात्री उशिरा पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस अधीक्षक संजय  उपस्थितीत आमदार जे.  पी.  गावित, डॉ. अजित नवले, डॉ. अशोक ढवळे, मा. आमदार नितीन भोसले यांच्यामध्ये मागण्यांसंदर्भात चर्चा सुरू होती. परंतु किसान सभेच्या शिष्टमंडळाने ज्या मागण्या मांडल्या. त्यावर पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन ठोस काही सांगू न शकल्याने किसान सभेचे समाधान झाले नाही. पोलिसांनी परवानगी नाकारली असली, तरी पदाधिकारी मोर्चा काढण्यावर ठाम होते.  नाशिक येथून झाला प्रारंभ... Video सकाळी ठरल्याप्रमाणे सर्व आदिवासी बांधव व शेतकरी एकत्र येऊन सकाळी १० वाजेच्या सुमारास लाल वादळ घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले. या मोर्चामुळे मुंबई नाका परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पुढे मार्गात आंबेबहुला येथे मोर्चेकऱ्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पालकमंत्री पुन्हा एकदा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करणार असल्याचे डॉ. अशोक ढवळे यांना संपर्क साधला, असे त्यांनी सांगितले. परंतु या चर्चेदरम्यान पुन्हा एकदा लेखी आश्‍वासन मिळाले नाही, तर आम्ही पुढे जाणार व जनतेचा भ्रमनिरास होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. या ठिकाणी आंबेबहुला गावाच्या बाहेर बॅरिकेडिंग, पोलिस फाटा, वॉटर कॅनन तैनात केला असल्याचे समजते. आम्ही मुंबईला गेलो काय आणि इथे प्रश्‍न सुटले काय, दोन्ही सारखे आहे. आमचा हा राजकीय स्टंट नाही. येथे प्रश्‍न सुटले तर इथूनच मागे निघून जाऊ. परंतु जर सरकारने प्रश्‍न समाधानकारक सोडविले नाही तर आमचा मोर्चा मुंबईपर्यंत जाणार, असे आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले.  राष्ट्रवादीसह मनसेचा पाठिंबा  किसान सभेने पुकारलेल्या लाँग मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांसह वांजुळपाणी संघर्ष समितीने पाठिंबा दिला आहे. मोर्चात खासदार समीर भुजबळ, आमदार जयवंतराव जाधव, रंजन ठाकरे, दिलीप खैरे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी सहभागी झाले होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com