कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांना पुराचा फटका

कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांना पुराचा फटका
कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांना पुराचा फटका

कोल्हापूर : गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली होती. पाणी चार ते पाच दिवस शिवारात राहिल्याने विशेष करून नदीकाठानजीक असणाऱ्या नुकताच लागवड झालेला ऊस, भात, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अद्याप नेमके किती नुकसान झाल आहे,.

याचा आकडा सामोरा आला नसला तरी किमान पाच हजार हेक्‍टरवरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष करून लहान उसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याने आता या शेतकऱ्यांना पुनर्लागवड करावे लागण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस, एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात, तर साठ हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. एक ते दीड हजार हेक्‍टरवरील भातालाही याचा फटका बसल्याचा अंदाज आहे.

गगनबावडा, राधानगरी, करवीर, पन्हाळा तालुक्‍यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. पंचगंगा, वारणा, दूधगंगा, भोगावती, हिरण्यकेशी आदी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर तीन ते चार दिवस शिवारात थांबून राहिले. यामुळे कोवळ्या खरीप पिकांचे नुकसान जादा झाल्याची भीती आहे. धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणी ओसरण्याची गती धीमी राहिली. यामुळे अधिक नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com