कृषी संजीवनी योजना फसवी : होगाडे

कृषी संजीवनी योजना फसवी : होगाडे
कृषी संजीवनी योजना फसवी : होगाडे

मुंबई : गेल्या सात वर्षांपासून शेती पंपधारकांना बोगस आणि पोकळ बिले देऊन वाढीव थकबाकी दाखविली जात आहे. त्यामुळेच २०१४ च्या कृषी संजीवनी योजनेत फक्त १८ टक्के शेती पंपधारक सहभागी झाले होते. त्यामुळे थकीत बिले दुरुस्त करा; अन्यथा ‘कृषी संजीवनीचा’ पुन्हा फज्जा उडेल, असा इशारा वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी दिला आहे.

मार्च २०१६ ला संपलेल्या कृषी संजीवेत थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट दिली होती. या वेळी ही सूट का काढून टाकली, असा सवाल होगाडेंनी उपस्थित केला आहे. २००४ साली जाहीर कृषी संजीवनीत ८० टक्के शेती पंपधारक सहभागी झाले होते. २०१०-११ पासून बोगस बिलिंग सुरू केल्याने २०१४ ते १६ काळात फक्त १८ टक्के शेतकरी सहभागी झाले. महावितरणची वीजगळती कमी दाखवण्यासाठी विनामीटर शेती पंपावर अधिभार टाकून वसुली सुरू केली. दीड ते पावणेदोन पट वाढवलेली वीजदरवाढ आणि सदोष बिले दुरुस्ती करूनच वसुली करावी; अन्यथा राज्यभर उद्रेक वाढेल, असा इशारा होगाडे यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com