नाशिक जिल्ह्यात गळीत हंगामाला मजूरटंचाईची झळ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : नाशिक जिल्ह्यात दोन सहकारी आणि एक खासगी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. उसाची मागणी नगर जिल्ह्यातून असल्याने या भागातील तीन कारखान्यांनी गोदाकाठचा ऊस तोडण्यासाठी मजुरांच्या टोळ्या पाठवल्या आहे. टोळ्यांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे साखर उतरलेल्या उसाची वेळीच तोड करण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरांसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आलेली आहे.

गळीत हंगामासाठी ऊसतोड मजुरांची उपलब्धता प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल्ह्यातून होते. त्याचबरोबर परराज्यांतून ऊसतोडीसाठी मजूर येत आहेत. त्यामुळे कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सदस्य शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यासाठी कारखाना ऊसतोड मजुरांची टोळी पाठवण्यास प्राधान्य देत असतो. पण, सध्या काही कारखाने अवसायनात आहेत. पण, त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पिकवण्याचे शेतकऱ्यांचे प्रमाण टिकून आहे. अशा शेतकऱ्यांचा ऊस दुसऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून अथवा जिल्ह्यातील दुसऱ्याच कारखान्यांकडून तोडला जातो. या ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांना ज्या टोळ्या पाठवल्या जातात त्यांची संख्या नाममात्र असते. याच टोळ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांना ऊसतोड करून कारखान्यांकडे रवाना करावा लागतो. गळीत हंगामाचा कालावधी आणि तोडीला होणारा विलंब यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पाणी भरण्याची वेळ येते, ही बाब खर्चिक आणि वेळखाऊ असते. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस वेळेत तोडला जावा, अशी चिंता असते.

नाशिक जिल्ह्यात सध्या कादवा सहकारी साखर कारखाना, वसाका, द्वारकाधीश या कारखान्यांचे गळीत हंगाम बॉयलर पेटले आहेत. त्याचबरोबर नाशिकमधील गोदाकाठचा ऊस कोपरगाव, संगमनेर, अकोले तालुक्यांतील साखर कारखान्यांकडून तोडला जात आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र अधिक असले तरी यंदा जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यांतील कारखान्यांनी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या शिवारांमध्ये आहेत. पण, त्यांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

गळीत हंगामासाठी ऊसतोडी मजुरांची उपलब्धता प्रामुख्याने मराठवाड्यातील जिल्ह्यातून होते. त्याचबरोबर परराज्यांतून ऊसतोडीसाठी मजूर येत आहेत. त्यामुळे कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सदस्य शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यासाठी कारखाना ऊसतोडी मजुरांची टोळी पाठवण्यास प्राधान्य देत असतो. पण, सध्या काही कारखाने अवसायनात आहेत. पण, त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पिकवण्याचे शेतकऱ्यांचे प्रमाण टिकून आहे.

अशा शेतकऱ्यांचा ऊस दुसऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून अथवा जिल्ह्यातील दुसऱ्याच कारखान्याकडून तोडला जातो. या ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांना ज्या टोळ्या पाठवल्या जातात त्यांची संख्या नाममात्र असते. याच टोळ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांना ऊसतोडी करून कारखान्यांकडे रवाना करावा लागतो. गळीत हंगामाचा कालावधी आणि तोडीला होणारा विलंब यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पाणी भरण्याची वेळ येते, ही बाब खर्चिक आणि वेळखाऊ असते. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस वेळेत तोडला जावा, अशी चिंता असते.

शेतकऱ्यांना ऊस तोडीसाठी प्रतीक्षा नाशिक जिल्ह्यात सध्या कादवा सहकारी साखर कारखाना, वसाका, द्वारकाधीश या कारखान्यांचे गळीत हंगाम बॉयलर पेटले आहेत. त्याचबरोबर नाशिकमधील गोदाकाठचा ऊस कोपरगाव, संगमनेर, अकोले तालुक्यातील साखर कारखान्यांकडून तोडला जात आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र अधिक असले तरी, यंदा जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील कारखान्यांनी ऊसतोडी मजुरांच्या टोळ्या शिवारांमध्ये आहेत. पण, त्यांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना ऊसतोडीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

नगर जिल्ह्यात पाठवल्या टोळ्या नाशिकला दोन सहकारी आणि एक खासगी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. उसाची मागणी नगर जिल्ह्यातून असल्याने या भागातील तीन कारखान्यांनी गोदाकाठचा ऊस तोडण्यासाठी मजुरांच्या टोळ्या पाठवल्या आहे. टोळ्यांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे साखर उतरलेल्या उसाची वेळीच तोड करण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरांसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com