सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, सात कारखान्यांची हंगामाची सांगता झाली आहे. जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडून ८० लाख १५ हजार २५४ टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपाद्वारे ९५ लाख ९ हजार ७५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षी एक कोटीचा साखर उत्पादनाचा निर्मितीचा आकडा पार होणार आहे.  

जिल्ह्यातील नऊ सहकारी व पाच खासगी साखर कारखान्यांनी यावर्षी गाळप हंगाम केला आहे. या १४ साखर कारखान्यांनी ५८० लाख १५ हजार २५४ टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपाद्वारे ९५ लाख ९ हजार ७५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील सरासरी साखर उताऱ्यात सुधारणा झाली असून ११.८६ टक्के मिळाला आहे. १४ पैकी सात कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. यामध्ये किसनवीर, ग्रीन पाॅवर, स्वराज्य, शरयू, लोकनेते बाळासाहेब देसाई, प्रतापगड, खंडाळा या कारखान्यांचा समावेश आहे. 

हंगामात गाळप व साखरनिर्मितीत सह्याद्री कारखान्याने आघाडी ठेवली आहे. सह्याद्री कारखान्याने ११ लाख २०० टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे १३ लाख ६६ हजार ५६० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर साखर उताऱ्यातही जयवंत शुगर या खासगी कारखान्याची आघाडी असून, या कारखान्यांचा सरासरी १२.५० टक्के साखर उतारा मिळाला आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील कारखान्यांनी एक कोटी क्विंटलपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन मिळाले होते. यावर्षीही शिल्लक उसाचा विचार करता एक कोटीपेक्षा अधिक उत्पादन होणार आहे. १४ पैकी सात कारखान्यांचा अद्यापही गाळप हंगाम सुरू असून एप्रिल अखेरपर्यंत हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com