जळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी योजनांना कमी प्रतिसाद

जिल्हा परिषदेच्या कृषी योजनांना कमी प्रतिसाद
जिल्हा परिषदेच्या कृषी योजनांना कमी प्रतिसाद

जळगाव : जिल्ह्यात जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला कमी प्रतिसाद आहे.

स्वावलंबन योजना ही मागासवर्गीय संवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. बिरसा मुंडा योजना ही अनुसूूचित जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. त्यासाठी अपेक्षित अर्ज आले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. स्वावलंबन योजनेसंबंधी ५ कोटी रुपये निधी यंदाच्या वर्षासाठी मंजूर आहे. मागील वर्षाचा निधीही कमी प्रतिसादामुळे अखर्चित राहीला. दुर्गम भागातील इंटरनेटच्या जोडणीअभावी ऑनलाइन अर्ज करताना अडचणी येतात. स्वावलंबन योजनेनुसार ५०० विहिरी करायच्या आहेत. मागील वर्षाच्या १६४ विहिरींची कामे सुरू आहेत. एवढा लक्ष्यांक कसा पूर्ण होईल, हा मुद्दा आहे.

कृषी क्रांती योजनेतूनही सुमारे २०० शेतकऱ्यांचा लक्ष्यांक आहे. विहीर, कृषिपंप, वीज जोडणी, विहीर दुरुस्ती आदी कामे या योजनेतून घेता येणार आहेत. यासंदर्भात तालुकानिहाय आढावा घेतला जात आहे. या योजनांचे अर्ज तहसीलदार, कृषी अधिकारी, सहायक निबंधक कार्यालयात जमा करण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रचार व प्रसार करायला हवा. शेतकऱ्यांना गावोगावी मोफत इंटनेट सुविधा ग्रामपंचायतीतच द्यावी. अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ असावी, अशी अपेक्षा काही जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com