वयोवृद्ध आई-वडिलांना सोडून दिल्यास तुरुंगवास

वयोवृद्ध आई-वडिलांना सोडून दिल्यास तुरुंगवास
वयोवृद्ध आई-वडिलांना सोडून दिल्यास तुरुंगवास

नवी दिल्ली : आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना असहाय्य स्थितीत सोडून देणाऱ्या मुलांना मिळणाऱ्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा कालावधी तीन महिन्यांवरून सहा महिन्यांपर्यंत वाढविण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार करत आहे. आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा 2007 चा आढावा घेणाऱ्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने मुलांच्या व्याख्येची व्याप्ती वाढविण्याचीही शिफारस केली आहे. मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की मुलांच्या व्याख्येत दत्तक किंवा सावत्र मुले, जावई आणि सुना, नातवंडे आणि कायद्याने पालकत्व स्वीकारलेल्या अल्पवयीन मुलांचाही समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्यात केवळ सख्खी मुले आणि नातवंडांचा समावेश आहे. मंत्रालयाने आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा 2018 चा मसुदाही तयार केला आहे. कायद्याचे स्वरूप मिळाल्यानंतर हा 2007 च्या जुन्या कायद्याची जागा घेईल. देखभाल भत्त्याची मर्यादा रद्द कायद्यातील मासिक देखभाल भत्त्याची दहा हजार रुपयांची जास्तीत जास्त मर्यादाही रद्द करण्यात आली आहे. जर मुले आई-वडिलांची देखभाल करण्यास नकार देत असतील, तर ते कायद्याचा आधार घेऊ शकतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com