सोलापुरातील शेतकरी अवेळी वीजपुरवठ्यामुळे हैराण

वीज भारनियमन
वीज भारनियमन
सोलापूर : मागील काही दिवसांपासून महावितरणने राज्यभर वीज भारनियमन चालू केले होते. ऐन सणासुदीच्या काळात वीज भारनियमन केल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. भारनियमनामुळे शेतीसाठी मात्र रात्री अवेळी वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. 
 
गेल्या एक-दोन दिवसांपासून भारनियमन बंद झाल्याचा दावा महावितरणचे अधिकारी करत आहेत. पण शेतीसाठी दिला जाणारा वीजपुरवठा पूर्वीसारखा करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. संपूर्ण राज्यभर शेतीसाठी रात्री अवेळी वीजपुरवठा केला जात आहे. पूर्वी रात्री दहा तास तर दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात होता. भारनियमन सुरू झाल्यामुळे दोन्ही वेळी शेतीचा वीजपुरवठा आठ तासांचा केला आहे. या बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
 
या बदलामुळे शेतीसाठी रात्री केला जाणारा वीजपुरवठा अतिशय त्रासदायक ठरत आहे. रात्री ११ ते सकाळी सात या वेळेत वीजपुरवठा सुरू ठेवला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलले असता वीजपुरवठ्यामध्ये झालेला तुटवडा हळूहळू भरून येऊ लागला आहे. गावातील भारनियमन बंद केले आहे. शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याच्या वेळेतही पूर्वीप्रमाणे बदल केला जाईल, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही. 
 
भारनियमन सुरू होण्यापूर्वी ज्याप्रमाणे शेतीसाठी वीज दिली जात होती, त्यात थोडीशी सुधारणा करून १२ तास वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. १२ तासांचा वीजपुरवठा करताना ऐन रात्रीच्या वेळेला पिकांना पाणी द्यावे लागणार नाही, तसेच त्याच्या वेळा निश्‍चित करण्याची मागणीही होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com