नाशिक जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना पेरण्यानंतर कर्ज

जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना पेरण्यानंतर कर्ज
जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना पेरण्यानंतर कर्ज

नाशिक : खरीप हंगामातील पीककर्ज वितरणास येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. यामागे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हेतू असला तरी पेरण्या आटोपल्यानंतर कर्जवाटप केल्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार का, याविषयी साशंकता आहे.

जिल्हा बँकेतर्फे खरीप पीककर्ज वितरणासाठी ३४७ कोटी ८० लाख रुपये लक्ष्यांक देण्यात आला होता. प्रत्यक्षात २३ हजार ४१ सभासदांना ३१४ कोटींचे पीककर्ज वाटप झाले. म्हणजेच लक्ष्यांकाच्या ९० टक्के पीककर्ज दिल्याचा बँकेचा दावा आहे. खरिपाची कर्जवाटपाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. ऑक्टोबरपासून रब्बी हंगामासाठी कर्जवाटप होते. बँकेने मात्र ३१ ऑक्टोबरपर्यंत खरीप कर्जवाटप करण्याचा घेतलेला निर्णय अनाकलनीय ठरला आहे.

खरिपाच्या पेरण्या कधीच आटोपल्या असताना आता कर्ज घेऊन फायदा काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. मुदतवाढ म्हणजे, वरातीमागून घोडे असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने बहुतांश शेतकरी सभासदांना पीककर्ज घेता आले नसल्याचे कारण बँकेने पुढे केले आहे.

बडे थकबाकीदार लक्ष्य

ऐपतदार, मोठे बागायतदार व हेतुपुरस्सर कर्ज थकविणाऱ्या १० लाखांवरील मोठ्या १०० थकबाकीदारांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. बँकेचे आजी-माजी सेवक, विविध आदिवासी विकास संस्थांचे आजी-माजी सचिव यांनीही कर्ज भरले नाही. बँकेमार्फत थेट कर्ज घेतलेले व थकबाकी कर्जदारांविरुद्ध सहकार न्यायालयात कायदा कलम ९१ अन्वये दावे दाखल करण्याबाबत बँकेने निर्णय घेतला असून,  प्राधिकृत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com