नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीसाठी १ लाख ९२ हजार अर्ज

शेतकरी कर्जमाफी
शेतकरी कर्जमाफी

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कृषी सन्मान योजनेत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज अपलोड केले. यात येत्या १५ सप्टेंबरपर्यंत राहिलेल्या शेतकऱ्यांनीही अर्ज करावेत. सर्व्हरमध्ये अडचणी असतील तर तेथे साधे अर्ज स्वीकारले जातील. अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.

राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाली असली, तरी त्याचा लाभ मात्र कुणालाही मिळाला नाही. साधारण दीड लाखाच्या आसपास शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा अंदाज असला तरी नेमका आकडा स्पष्ट व्हायचा आहे. दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीसोबत नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना २५ हजारांच्या अनुदानाची सोय आहे.

कर्जमाफीसाठी अटी, शर्तीची पूर्तता करावी लागणार असल्याने त्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडून शासनाने ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. त्याला जिल्ह्यात प्रतिसादही मिळत आहे. आतापर्यंत एक लाख ९२ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत.

दहा रुपयांहून अधिक शुल्क शेतकऱ्यांकडून घेऊ नयेत, अशा सूचना देत ऑनलाइन अर्ज भरून घेण्याच्या जिल्हा यंत्रणेला सूचना आहेत. सर्व्हरला अडचणी असतील अशा ठिकाणी शेतकऱ्यांचे लिखित अर्ज घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आज यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीही येत्या १५ तारखेपर्यंत शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com