सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही

सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही
सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही

अर्धापूर, जि. नांदेड :  राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल. सहकार क्षेत्रातील उद्योग अडचणीत आणण्यासाठी गेल्या तीन वर्षांत राजकीय हस्तक्षेप झाला. तसेच नैसर्गिक आपत्ती आली. पण या दोन्ही संकटांवर मात करून कारखाने वाचविल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी  (ता.२) केले.  भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या २२ व्या गळीत हंगामाची सुरवात गुरुवारी गव्हाणीत ऊस मोळी टाकून करण्यात आली. या वेळी आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये खा.चव्हाण बोलत होते. या वेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार डी.पी.सावंत, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, माधवराव पाटील जवळगावकर, कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, बाजार समितीचे सभापती बी.आर. कदम, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर केशवराव इंगोले पाटील, जगदीश पाटील कल्याणकर, संजय देशमुख लहानकर, किशोर भवरे, उपमहापौर विनय पाटील गिरडे आदी उपस्थित होते.  श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, कारखाना चालवताना शेतकऱ्यांचे हित जोपासून काटकसरीने कारभार केला. आसवनी प्रकल्प पूर्ण झाल्यावर उसाला जादा भाव देता येईल. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, की राज्यातील फडणवीस सरकार हे आंधळ्यांचे व बहिऱ्यांचे सरकार आहे. या सरकारला कर्ज माफी द्यायची नाही. केवळ हे सरकार चालढकल करीत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com