सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठा

सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठा
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठा

सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. वीजनिर्मितीत महत्त्वाच्या कोयना धरणात १२.२१ टीएमसी कमी पाणीसाठा आहे. यामुळे कोयनासह इतर धरणांतील पाण्याचे नियोजन काटकसरीने करावे लागणार आहे. 

जुलै व ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणातील पाणीपातळी निश्‍चित होत असते. या दोन्ही महिन्यांत दमदार पाऊस झाल्याने सर्वच धरणे भरून पाणी सोडावे लागले होते. मात्र, दुष्काळी तालुक्यात पावसाची वक्रदुष्टी झाल्याने पाण्याची टंचाई भीषण होत गेली. यामुळे पाण्यासाठी टँकरची वाट बघावी लागत आहे. नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाई भासू लागल्याने अनेक धरणांतील पाणी दुष्काळी तालुक्यांत सोडावे लागले आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी आहे.

वीजनिर्मिती; तसेच जलसिंचनासाठी कोयना धरण महत्त्वाचे असून, या धरणात गतवर्षी या कालावधीत ९६.०२ टीएमसी पाणीसाठा होता. या वर्षी या धरणात ८३.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांत सध्या उरमोडी धरणातून पाणी सोडले जात आहे. तेथेही ३.०१ टीएमसी कमी पाणीसाठा दिसत आहे. धोम धरणातही तशीच परिस्थिती आहे. या धरणात १.८४ टीएमसी कमी पाणीसाठा आहे.

धोम-बलकवडी धरणात १.०७ टीएमसी, कण्हेर धरणात ०.७१ टीएमसी, तारळी धरणात ०.२ टीएमसी कमी पाणीसाठा आहे. सध्या कोयना धरणात ७९.६३, धोम धरणात ६९.२२, उरमोडीत ६५.१६, कण्हेरमध्ये ८१.७३, धोम-बलकवडीत ७३.१०, तारळी धरणात ७९.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. अजून जवळपास पुढील सहा महिने लक्षात घेऊन पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे, अथवा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com