‘महावितरण’ने जिल्ह्यातील १५७५ पाणी योजनांचा वीजपुरवठा तोडला

‘महावितरण’ने जिल्ह्यातील १५७५  पाणी योजनांचा वीजपुरवठा तोडला
‘महावितरण’ने जिल्ह्यातील १५७५ पाणी योजनांचा वीजपुरवठा तोडला

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांचे ३५ कोटी रुपयांचे वीजबिल थकल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने जिल्ह्यातील एक हजार ५७५ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईला तोंड देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.  वीजबिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीने ५० टक्के वाटा उचलावा लागतो. उर्वरित ५० टक्के निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिला जातो. जिल्हा परिषदही जिल्हा नियोजन, केंद्र शासनाच्या योजना आणि सेस निधीचा ताळमेळ घालून हे पैसे देते. सध्या थकीत असलेल्या ३५ कोटींपैकी १६ कोटी रुपये देण्याचीही जिल्हा परिषदेची आर्थिक स्थिती नाही. राज्य सरकारच्या पुढाकारानेच हा प्रश्‍न आता सोडविला जाऊ शकतो. पण, महावितरण कंपनीकडूनही जिल्हा परिषदेला येणे आहे. महावितरणच्या वीज उपकेंद्र व इतर यंत्रणांसाठी ग्रामपंचायतीच्या जागा महावितरणने घेतल्या आहेत, याचा सेस त्यांनी अद्याप भरलेला नाही.            या रकमेची तालुकावार माहिती घेण्याचे आदेश आता गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पण, आता या वीज तोडलेल्या पाणी योजनाचे काय, हा प्रश्‍न आहे. त्यातच सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे यावर तातडीने जिल्हा परिषदेने निर्णय घेण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com