व्यवस्थापनाद्वारे मिरची उत्पादनवाढ शक्‍य

व्यवस्थापनाद्वारे मिरची उत्पादनवाढ शक्‍य
व्यवस्थापनाद्वारे मिरची उत्पादनवाढ शक्‍य

नंदुरबार : मिरची पीक नाजूक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन अगदी रोपावस्थेपासून करणे आवश्‍यक आहे. या अवस्थेत रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तो न रोखल्यास विषाणूजन्य रोगांचे आक्रमण पिकावर होते, असे मत तज्ज्ञांनी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

कोळदा (ता. जि. नंदुरबार) येथे मिरची पीक प्रशिक्षण कार्यक्रम गुरुवारी (ता. ६) झाला. त्यात रायपूर (छत्तीसगड) येथील तज्ज्ञ नवीन पडियार, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पटेल, मिरची उत्पादक प्रवीण चावला, योगेश विठ्ठल पटेल (पिंपळोद, जि. तापी, गुजरात), जगानन बारबुद्धे यांनी आपले विचार मांडले. केव्हीकेचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रगतिशील शेतकरी चावला म्हणाले, ‘‘फर्टिगेशन अतिशय महत्त्वाचे आहे. त्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. डीएपीचा अधिक वापर टाळावा.``

‘‘मिरची पिकाचे व्यवस्थापन लागडवडीपासून व्यवस्थित करायला हवे. फवारण्यांचे वेळापत्रक पाळले पाहिजे. निर्यातक्षम मिरचीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे योगेश पटेल यांनी सांगितले. पडियार यांनी मिरची पिकासंबंधीचे नवतंत्रज्ञान, कमी खर्चातील खत व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.

प्रास्ताविक दहातोंडे यांनी केले. संचलन विषयतज्ज्ञ आर. एम. पाटील यांनी केले. कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ पी. सी. कुंदे, जयंत उत्तरवार, यु. डी. पाटील, आर. आर. भावसार, गीता कदम, राहुल नवले आदींनी सहकार्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com