अनेक शेतकऱ्यांनी फिरविली विम्याकडे पाठ

``विमा कंपन्या ठरावीक मंडळांतील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देतात. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार बागायतीला तेरा हजार पाचशे, जिरायती शेती असल्यास सहा हजार आठशे भरपाई असल्यास ती दिली गेली पाहिजे. विमा कंपनी हा कायदा मानत नाही. विमा कंपन्यांचा शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याचा गोरखधंदा आहे.`` - एस. बी. पाटील, शेतकरी, चोपडा (जि. जळगाव)
अनेक शेतकऱ्यांनी फिरविली विम्याकडे पाठ
अनेक शेतकऱ्यांनी फिरविली विम्याकडे पाठ

जळगाव : पीकविम्याची रक्कम भरल्यानंतरही आपत्ती आल्यास ठरावीक शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळतो. अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांची नुकसानीनंतर चोवीस तासांच्या आत नोंद घेऊन त्याबाबत दिल्लीतील विमा केंद्रास कळविले जात नाही. पीकविमा हप्त्याची रक्कम अधिक अन् भरपाई कमी, यासह विविध कारणांमुळे शेतकरी पीकविम्याकडे पाठ फिरवितात, असे चित्र आहे. यातच मोजक्‍याच शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळतो, असा आरोप प्रगतिशील शेतकरी एस. बी. पाटील (चोपडा) यांनी केला आहे.

जिल्ह्यात २०१७ मध्ये ८५ हजार ५७८ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. त्यातील ३० हजार ६६३ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळाला. ५४ हजार ९१५ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.

पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना अपूर्ण पाऊस, पावसाचा खंड व अतिप्रमाणात पाऊस, या तीन हवामान घटकांच्या धोक्‍यापासून संरक्षण मिळते. जिल्हा मध्यवर्ती बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंका पीक कर्ज देतानाच पीकविम्याची रक्कम कापून घेते. जे शेतकरी मात्र कर्ज घेत नाहीत ते पीकविमा भरत नाहीत. त्यांनीही पीकविमा काढावा, यासाठी कृषी विभाग प्रयत्न करतो.

काय आहे स्थिती : शेतकरी लाखो रुपयांचा पीकविमा काढतात. मात्र, नुकसान झाले तर त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. काही ठरावीक महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना नुकसानीचा विमा मिळतो, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. ज्या ठिकाणी विमा कंपन्यांनी हवामान मापक यंत्रे उभारली आहेत, त्यातील काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना विम्याचा कंपनीच्या मनमानीप्रमाणे लाभ मिळतो.

काय हवी उपाययोजना : शासनाच्या महसूल मंडळात हवामानमापक यंत्रे आहेत, त्या ठिकाणावरूनच संबंधित विमा कंपन्यांनी नुकसानीची माहिती घेऊन भरपाई दिली पाहिजे. नुकसानभरपाई देताना मागील तीन वर्षांचा आढावा घेऊन भरपाई दिली जाते. जर शंभर रुपयांचा विमा काढला असेल तर विम्यापोटी केवळ वीस रुपये मिळतात. तक्रारीसाठी शेतकरी महसूल विभागाकडे गेल्यास ते विमा कंपनी किंवा कृषी विभागाकडे जाण्यास सांगतात. कृषी विभागाकडे गेल्यास ते महसूल विभाग पंचनामे करतो त्यांच्याकडे जाण्यास सांगतात.

आकडे बोलतात.. पीकविम्याची २०१७ मधील स्थिती * विमा काढलेले शेतकरी- ८५ हजार * लाभ मिळालेले शेतकरी- ३० हजार * वंचित शेतकरी- ५४ हजार * भरलेली रक्कम- १६.३३ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com