मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या ५७४ पैकी ३४५ मदतीस पात्र

शेतकरी आत्महत्या ५७४ पैकी ३४५ मदतीस पात्र
शेतकरी आत्महत्या ५७४ पैकी ३४५ मदतीस पात्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १ जानेवारी ते १९ ऑगस्टदरम्यान ५७४ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे झाले. यापैकी ३४५ प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरली असून, ३३३ प्रकरणांत मदत देण्यात आली आहे. तर १५१ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली आहेत.

नापिकी, कर्जबाजारीपणा आदींमुळे निर्माण झालेल्या विवंचनेने मराठवाड्यातील शेतकरी मृत्यूला जवळ करीत आहेत. शासन दरबारी दाखल शेतकरी आत्महत्यांविषयी प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी ते १९ ऑगस्ट २०१८ दरम्यान मराठवाड्यातील ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ३४५ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली.

त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ५८, जालना ५१, परभणी ५०, हिंगोली १६, नांदेड २६, बीड ८६, लातूर ३२ तर उस्मानाबाद जिल्ह्यांतील २६ शेतकरी आत्महत्यांचा समावेश आहे. एकूण ५७४ प्रकरणांपैकी १५१ प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १६, जालना ५, परभणी २०, हिंगोली ८, नांदेड २३, बीड ७, लातूर १८, उस्मानाबाद ५४ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांचा समावेश आहे.

शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरलेल्या ३४५ प्रकरणांपैकी ३३३ प्रकरणात शासनाकडून मदत देण्यात आली आहे. १२ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात अजूनही शासनाची मदत देणे बाकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com