दरम्यान, मंत्र्यांनीच योजना बंद करायची असे मनी ठाम धरल्याने ही योजना बंद पडल्याचे स्पष्ट आहे. या योजनेसंदर्भात २२ सप्टेंबर २०१५ ला झालेल्या बैठकीत या योजनेच्या अभ्यासासाठी समिती गठित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ता. १५ फेब्रुवारी २०१६ ला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, पाणीपुवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव, महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक, नाशिक येथील जलविज्ञान प्रकल्पाचे मुख्य अभियंता आदी पाच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली.
मात्र समितीच्या अहवालाची वाटही न पाहता यानंतर सातच दिवसांनी (ता. २२ फेब्रुवारी २०१६) या दिवशी योजनेचे काम बंद करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले. यानंतर समितीने ता. १२ ऑगस्ट २०१६ रोजी सकारात्मक अहवाल सादर केला. योजनेच्या कामात प्रशासकीय व आर्थिक अनियमितता आढळून आली नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. सकारात्मक अहवालानंतर दीड वर्षानंतरही योजनेचे काम स्थगितच आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.