शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून कापूस प्रक्रियेला मिळावी चालना : कृषी आयुक्त

कापसासाठी स्वतंत्र शेतकरी कंपन्या उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठीचा आराखडा अद्याप पहिल्या टप्प्यात आहे. याबाबत चाचपणीकरीता नागपूरात एक बैठक पार पडली. या बैठकीत आलेल्या सूचनांचा विचार आराखडा इतर योजना अंतिम करताना केला जाईल. - सचिंद्र प्रताप सिंह, कृषी आयुक्‍त.
शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक
शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक

नागपूर ः शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रेडींग, क्‍लिनींग त्यासोबतच डाळमिल तसेच फळपिकांवर आधारीत प्रक्रिया उद्योग उभारले गेले. त्याचधर्तीवर उत्पादक शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून कापूस प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी, अशी अपेक्षा कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रताप सिंह यांनी व्यक्‍त केली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच प्रयोगशील शेतकरी, शेतकरी गट तसेच शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींची कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या समवेत बैठक झाली.

या वेळी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, की दूध उत्पादकांच्या स्वतंत्र शेतकरी कंपन्या स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्याच धर्तीवर कापसाच्या बाबतीतही अशाप्रकारचा प्रयत्न होण्याची गरज आहे. राज्यात ४० लाख हेक्‍टरवर कापसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु, प्रक्रिया उद्योगाचा अभाव असल्याने हंगामात दरातील चढउताराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कापूस उत्पादक शेतकरी कंपन्यांच्या मार्फत हे काम झाल्यास या भागातील कापूस उत्पादकांना चांगले दर मिळणे शक्‍य होणार आहे. या भागातील शेतकरी कंपन्यांनी त्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com