नवी दिल्ली : देशात गाळप हंगामाने वेग घेतला अाहे. देशातील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्ये १ लाख १९ हजार ९८२ टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कारखान्यांनी १ लाख १८ हजार टन साखर उत्पादन घेतले होते, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने संघाने दिली अाहे.
महाराष्ट्रात अाॅक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू झाला नाही. त्यामुळे अपेक्षित साखर उत्पादन मिळालेले नाही, असे साखर संघाचे सरसंचालक प्रकाश नाईकनवरे यांनी म्हटले अाहे.
दिवाळीत साखरेचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी देशातील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू करण्याची विचारणा केंद्र सरकारने केली होती. दरम्यान, महाराष्ट्रातील गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला अाहे.
उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्येच गाळप हंगाम सुरू केला अाहे.येथील कारखान्यांनी अाॅक्टोबरमध्ये २९,६५० टन साखर उत्पादन घेतले अाहे. कर्नाटक अाणि तमिळनाडूतील कारखान्यांनी गाळप सुरू केले अाहे.
कर्नाटकातील कारखान्यांनी ७४,६०० टन अाणि तमिळनाडूतील कारखान्यांनी ११,४६४ टन साखर उत्पादन घेतले अाहे. अाॅक्टोबरमध्ये सरासरी साखर उतारा ८.६५ टक्के एवढा राहिला अाहे. तापमानात घट झाल्यानंतर पुढील काही दिवसांत साखर उताऱ्यात सुधारणा होईल, अशी अाशा श्री. नाईकनवरे यांनी व्यक्त केली अाहे.
देशातील साखर उत्पादन २०१६-१७ या हंगामात २०.२ दशलक्ष टनांपर्यंत खाली अाले होते. यंदा (२०१७-१८) साखर उत्पादन २५.१ दशलक्ष टनांवर पोचेल, असा अंदाज भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) व्यक्त केला अाहे.