मिरज तालुक्‍यात शेततळ्यांचा उच्चांक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मिरज, जि. सांगली : एखादी योजना प्रभावी पणे राबविली तर ती योजना शेतकऱ्यांना फायदा देणारी ठरते. शासनाची मागेल त्याला शेततळे योजना राज्यात प्रभावीपणे राबविल्याचे दिसून येत आहे. याचा प्रत्यय मिरज तालुक्‍यात दिसून आला आहे. मिरज येथील तालुका कृषी कार्यालयाने तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांत ५२४ शेततळी घेतली असून, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर पाणी साठा होणार आहे.

तालुका कृषी विभागाने २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये जोरदार कामगिरी करत उच्चांकी संख्येने शेततळी मंजूर केली. बागायत शेतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेत पाणीसाठी केला. गेल्या काही वर्षांत म्हैसाळ योजनेतून नियमित उपसा होऊ लागल्याने शेतकरी बागायती पिकांकडे वळले. द्राक्षबागा व उसाचे क्षेत्र वाढले. काहीवेळा म्हैसाळ योजना थकबाकीस्तव बंद राहू लागल्याने बागायतींपुढे पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले.

त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी शेततळ्यांना प्राधान्य दिले. आजमितीस तब्बल पन्नास कोटी लिटर इतका पाणीसाठा शेततळ्यांमुळे झाला आहे. त्यासाठी शासनाकडून तब्बल सव्वादोन कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे.

सोनी गावात सर्वाधिक शेततळी शासनाच्या अनुदानातून सोनी गावात ११० शेततळी शेतकऱ्यांनी घेतली आहेत. या गावात द्राक्ष बागायतीद्वारा गावाचा आर्थिक कायापालट करणाऱ्या सोनीच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी शेततळ्यांचा आधार घेतला. संपूर्ण द्राक्ष शेतीला या शेततळ्याचा आधार मिळतोय. टॅंकरवरचा खर्च कमी करत सोनीचे शेतकरी शेततळ्यांमुळे पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झाले आहेत. यामध्ये करोली ६५, मालगाव ४७, भोसे ५७ आणि आरग येथे ४० शेततळे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com