भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या

भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या
भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई  : राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपची जुमलेबाजी जनता आता स्वीकारणार नाही.  त्यांच्या मुखात शिवाजी महाराज आणि हृदयात छिंदम असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपला लगावला.

सामाजिक एकता, अखंडता धोक्‍यात आणणाऱ्या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कृषी, परराष्ट्र नीती, अंतर्गत सुरक्षा या सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपचा स्थापना दिवस सोहळा म्हणजे नापास झालेल्यांनी आनंद साजरा करण्याचाच प्रकार आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपची जुमलेबाजी जनता आता स्वीकारणार नसल्याचे सांगून त्यांच्या मुखात शिवाजी महाराज आणि हृदयात छिंदम असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपला लगावला. चव्हाण म्हणाले, की ‘‘राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयाला आत्महत्यालय करणारे शेकडो कोटींची उधळपट्टी करून स्थापना दिवसाचा उत्सव साजरा करीत आहेत. हा आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांच्या मरणाचा उत्सव का?’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com