आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी न सोडल्यास आंदोलन

आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी न सोडल्यास आंदोलन
आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांत पाणी न सोडल्यास आंदोलन

औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाखाली असलेल्या हिरडपुरी, आपेगाव बंधाऱ्यांत तत्काळ पाणी सोडा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पैठण तालुक्‍यातील शेतकऱ्यांसह अन्नदाता शेतकरी संघटनेने दिला आहे. 

मराठवाड्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना यासंदर्भात अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी व विनोद तांबे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. त्यानुसार आपेगाव व हिरडपुरी बंधारे कोरडेठाक पडल्याने रब्बीचे पीक हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या बंधाऱ्यांमधील पाण्याच्या भरवशावर चार तालुक्‍यांतील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. येत्या आठवडाभरात शासन व प्रशासनाने पाणी सोडण्यासंदर्भात पावले न उचलल्यास शेतकऱ्यांचा प्रपंच उद्‌ध्वस्त होईल. 

चारा पिके, गहू, फळबागा, जळून जातील; त्यामुळे तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी जयाजीराव सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांना शेतकरी प्रश्नावर आवाज उठविण्याची मागणी करण्यात आली. विभागीय आयुक्‍तालयावर पाणी सोडण्यासंदर्भात मागणी करतेवेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com